पाटोदा: शिवजागृती न्यूज
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील ऊसतोड मजुरांनी ग्रामसेवकामार्फत आपली नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक मुरली तांबे यांनी केले आहे.
उसतोड कामगारांनी ग्रामसेवकाकडे स्वतःचा फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आदींसह कागदपत्रांची सत्यप्रत देवून आपली नाव नोंदणी करावी. तसेच ज्या ऊसतोड कामगारांनी सध्या ऊसतोडणीचे काम बंद केलेले आहे. मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांनी पण नाव नोंदणी करावी.
हाडाचे काडं आणि रक्ताचे पाणी करून गोड साखर निर्माण करणाऱ्या ऊसतोड कामगारांना राज्यशासना मार्फत सर्व लाभ मिळावा या उदात्त भावनेतून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना केलेली आहे. ग्रामसेवकांनी सर्व ऊसतोड कामगारांचा आदर करून अचूक नोंद करावी, अशी विनंती मुरली तांबे यांनी यावेळी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा