जोमात आलेली पिके गेली कोमात;सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्यावी- दीपक घुमरे


 

 

पाटोदा:शिव जागृती न्यूज


आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि या कृषिप्रधान देशातच आपल्या शेतकरी वर्गाची प्रत्येक वेळेस दयनीय अवस्था होत असते कधी नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, गारपीट,पूर,दुष्काळ,अपुरा पाऊस या विविध कारणांमुळे शेतकरी सतत संकटात सापडत आला आहे.या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन भरघोस खर्च करून सोयाबीन उडीद मूग व इतर पिकांची लागवड केली आणि ते आनंदाने डोलू लागले.पिके एकदम जोमात आली. 


पाटोदा तालुक्यात गोगलगायींमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आणि आता जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे सर्व जोमात आलेली पिके कोमात गेली .सर्व पिकांनी माना टाकल्या असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे,गेली दोन वर्षे, पिके वायाला गेलेली असताना सुद्धा शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने, जोशाने शेतात राबत आहे.


 सरकारने शेतकऱ्यांच्या  बांधावर जाऊन  पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी व पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा घुमरे यांनी केली आहे.

 

टिप्पण्या